बुधवार, ११ जून, २००८

... पाऊस-गीता ...


ह्या इथलं आभाळ सांग कसं होतं,
पाऊस घेऊन दाटलेलं की ठिकठिकाणी फाटलेलं?
जमलेल्या चांदण्यांना कवेत घेऊन
अनेक बरया वाईट आठवनींच कोसळण्यासाठी गोठलेलं?
कुठं भेगा होत्या, कुठं चीरा होत्या,
कुठं वेदना वाहून नेणारया स्पष्ट दिसणारया शीरा होत्या.
प्रेम झुळकीच्या ओढीने डोळ्यांगत व्याकुळलेलं!...
सांग इथलं आभाळ कसं होतं?...


तुला काय ठाऊक म्हणा!...
चांदण्यांच्या प्रकाशाने दीपून जाणारी तू,
स्वप्नांच्या कोषातच पाऊस झेलणारी तू.
ओंजळभर थेंबांनी श्रीमंत होणारी तू.
आठवणींच्या जगात अगदी सहज वावरणारी तू!
तुला काय माहित म्हणा!...
इथलं आभाळ ते कसं होतं?


ती म्हणाली...
आभाळाचं काय घेऊन बसलास चांदण्यांकडे बघ.
गडगडणारया ढगां पेक्षा चमचमणारया जगाकडे बघ.
आनंद कसा शोधावा मग तो कसा जगावा ते माझ्याकडून शिक.
ओंजळभर का असेना ते मला गावलेलं होतं.
माझ्या हक्काचं हे जीवन मला पावलेलं होतं.
शंकेचं ते काळभोर, ठिकठीकाणी कुरतडलेलं तुझं आभळं ज़रा फुंकून बघ.
भेगा,चीरा आणि क्षीरा बघणारे तुझे डोळे ज़रा पूसून बघ.
गोठलेलं ते तुझं आठवणीनंच जग बघ मग कसं बरसू लागतं!
त्याच्या निळ्याशार श्रीमंत थेंबांनी बघ कसं हसू लागतं!


तिची पाऊस-गीता बरसतच होती,
आणि मी ही चिंब झालो होतो
हिरव्यागार आठवाणीत सहझ वावरत!...

---भूराम

२ टिप्पण्या: