माणूस म्हणून जगण्यासाठी केलेल्या प्रयत्नात कविता माझ्या सोबतीला आली.... त्या सोबतीत फुललेल्या काही क्षणांची ही एक पुसटशी नोंद.... (तुमचे अभिप्राय जरूर नोंदवा...)
रविवार, १३ ऑक्टोबर, २०१३
** मदारी **
घन बांधतो उद्याशी आकाश संभ्रमाचे
जगण्यातल्या धुळीचे आकांत मोह माझे.
अंधार श्वापदांचा हा भोवतीस आहे
स्पर्शातल्या रतींचा तो रोज भास आहे.
रक्तात कोसळावे गंधाळती इशारे
ऋण बांधता क्षणांशी आवेशती निखारे.
पाऊस पावलांना, सृष्टीतल्या चरांना
अवनीस कडाड तो अन तेज अंकुरांना
मी पाहतो वयाचे हे नित्य नृत्य आहे
कधी वाहतो, कधी मी, पेटतोच आहे!
हे संभ्रमी नसे का? तू सांग यौवनारे
त्या चांदण्याच आहे कि दुःख स्पंदनारे?
स्पन्दाताल्या युगाशी हो व्यक्त तू आता रे !
विस्तारता घडीला मी मुक्त तू आता रे!
जाणुन आज घे तू, ह्या भावना दुधारी
अन दे छेद त्या रूढींना होय तूच तो मदारी.
-भूराम
(१०/१३/२०१३)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा