शनिवार, १४ जून, २००८

प्रयत्नच सांगतात...

प्रयत्नच सांगतात कुणास किती गती,
बसून बोलणारयाना फक्त बोलण्यां इतकीच मती.
भिऊ नकोस अंधाराला, काही अंधार तुला खात नाही.
कारण थांबणारयांनाच असते अंधाराची भिती.
प्रयत्नच सांगतात कुणास किती गती...

तू पाऊस घेऊन आलस तर भीजत नाचतील मुलं.
तसाच निघून गेलास तर तुलाच कोसतील मूलं.
जगाची हया इथल्या अशीच असते नीती.
प्रयत्नच सांगतात कुणास किती गती...

म्हणून माझं तुला एकच आहे सांगणं,
न थांबता तू सतत प्रयत्न करणं.
मग तुला अडविण्याची कुणा होईल छाती.
प्रयत्नच सांगतात कुणास किती गती...

--भुराम.

३ टिप्पण्या: