सोमवार, १ सप्टेंबर, २००८

आज जगावे

दुःख आतचे असेच द्यावे, रक्त कालचे ओकून.
आज जगावे घडण्यासाठी, भान उद्याचे ठेवून.

मी मनाशी सदैव म्हणतो, किती विषारी हा वारा.
जगणे अधिकच दुष्कर होते, श्वास ठेवता कोंडून.

टाळू म्हणता, येत्या घडिला,
गमावून कितीक बसतो...
जगु म्हणता, तिच घडी ती,
ओरबाळून मनी जळतो...

असेच घडते दुःख आतचे, आतच दबले कुजले जर
दर्प विषारी गिळून टाकतो, आज उद्याला कोळून.

म्हणून म्हणतो टाक सख्या रे, रक्त कालचे ओकून
आज घडावे जगण्यासाठी, भान उद्याचे ठेवून.

-भूराम...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा