रविवार, १४ सप्टेंबर, २००८

उभारी


उडणा-यांनो आकाशात या
घ्या मनाची स्वैर भरारी.
जगणा-यांनो बंधने तुमची
बंधनात घ्या सदैव प्यारी.

रोष जगाचा होतो आहे,
होत असेल तर होवू दे आता.
भीती जगाची कोण उराशी,
उर असेल तर लिहुया गाथा.

उगवतीचे रंग विखुरते,
विखुरतेय पहा तेज असेच.
अंधाराचेही राज्य सरते,
सरेल आपले दुःख तसेच.

पेटवू या आत्म स्वयेच,
स्वयेच कळेल वाट पूढेच.
चालणार-यांना भय ते कसले,
कसले आता थांबणे नसेच.

चैत्यंन्याची ही अलोट गंगा
’गंगे’ सुर गुंजू दे शिवारी
चहुकडे अहा! आपुलेच राज्य
राज्यात ह्या नवी उभारी...


--भूराम
२८/११/२००१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा