बुधवार, १० सप्टेंबर, २००८

माझ्या काही चारोळ्या...

प्रयत्न असतं, जगणं असतं.
आभाळकडे बघणं असतं.
पून्हा काही नविन निर्माव
हेच पावसाला मागणं असतं.

*****************

आभाळ पून्हा तेच सांगतं
जगणं मात्र विसरू नको.
पावसाच्या थेंबा थेंबात
भिजणं मात्र विसरू नको.

*****************

सगळं सगळं करावसं वाटतं
सगळं करतांना मीच विखुरतो
पून्हा एका जागी एकत्र येतानां
आयुष्य मात्र हरवतो.

*****************
आपल्या भेटची शेवटची आठवण
अजून मला आठवत होती
दूर जातांनाची तुझी आसवं
अजून डोळ्यात दाटत होती.

******************
मी आयुष्याचा जन्म मुठीत घेवून.
मृत्युच्या दारात भरकटत होतो.
ज्याला आयुष्य ही नाही, मृत्युही नाही.
त्या अश्वत्थाम्याला शोधत होतो.

******************
अंधार हा चहुकडे आधीपासुनच असतो.
प्रकाश मात्र निर्माण करावा लागतो.
प्रकाश निर्मिणारयाला लोक सुर्य म्हणतात.
आणि चंद्राला फ़क्त आंधळे प्रेमीच बघतात.

---भूराम

1 टिप्पणी:

  1. Indeed Poem is a safety valve, an escape, a refuge, a support... etceteras, and above all a creative medium. However in the present pace of fast life, I am of the opinion, poem is the best means of communication.

    Please except my sincere compliments. I don’t mind writing in English even on my Marathi blogs, though i ma proud of my mother tongue, because everyone who accesses Internet is English educated person.

    उत्तर द्याहटवा