शनिवार, १ जानेवारी, २०११

संभ्रमी

काळ रेटतो, वाटा नाही
थांबलो मी पण, लाटा नाही.
आडोश्याला आहे जी बघ
भिंत एकटी, विटा नाही.

असेच असते दुःखांचे जग
अनेक दुःखी माझे ही मग,
एकटा मी तर सदाच वाटे
दुःख एकटे? कधीच नाही.

प्रयत्नातूनि प्रयत्न करतो
गरज संपता शोध ही सरतो
गरज खरीतर तशीच असते
देहच नश्वर इलाज नाहि!

किती मिळाले! प्राक्तन रडतो,
आज रेटला, उद्यास भीडतो
आज उद्याचे नातेच फ़सवे
उद्यास भीडता आजच होई.

नसे संभ्रमी याहून काही
दुःख असे हे सलत राही.
सवयिचे मग होते जगणे
रुते वेदना, काटा नाहि.

-भुराम
(01/01/2011)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा