मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

।।आभाळ।।

तिथंही आठवण होती आणि इथंही
आभाळाला ये म्हटलं तर म्हणाला,
“नको तुझ्या प्रत्येक
शब्दात
खुप चमका निघतात
काळजात
भारलेल्या नजरेत
गारठून येते फार
जवळ आलो तर
गडगडायला होतं
त्या ऱ्हदयीच्या
हर एक धडधडीने
नको मित्रा नको
तुच कोसळतो मग
मिठीत मला घेवून
लोकांना वाटतं की
मीच कोसळलोय
आणि
ही माझ्या मित्राचीच
आसवं आहेत येव्हढंही
बोलवलं जात नाही मग,
ह्या आवंढून आलेल्या
कंठाला.
नको मित्रा नको”

-भूराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा