शुक्रवार, १७ एप्रिल, २०२०

मनभर


मनभर क्षणभर
चांद देखणा धिवर
तोच आभाळी रेखतो
छान चांदणी मखरं.
भर भोवताली ऋचा
स्नेह स्नेहावली त्वचा
त्या काळीजी वदाला
पेलं सावध अधरं.
थांब थांबलेलं जगं
घडे निसर्गाचा वगं
गळे भोवताली आता
अहं मानवी पदरं.
मनभरं क्षणभरं
ऋणझुणते शहरं
ह्या मरणं मिठीला
काळं बिलगला खरं.
बांध बंधन स्व:ताचे
साह एकांताचे टोचे
देत उद्याच्या उन्हाला
आज जागता प्रहरं.

-भूराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा