शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

तो 'घन'- मी 'मन'.

तो मन धुक्याच्यावेळी
स्निग्ध चांदणी झाला.
क्षण आवरता आवरता
तो किती लाघवी आला.

घन-अंधारातून त्याच्या
विश्वात मी कोसळलो.
व्रण थेंब थेंब वाळूचा
कोरडा शोषूनी व्यालो.

मी निळ निळ माथ्याची
ती अशी उधळून देतो.
डोळ्यात, पापणी काठा
तो तसाच बिलगूनी येतो.

मी उठतो पाण्यावरती
तरंग जणू घन-भारी
तो हिरव्या वाटेवरला
प्रवास होई जरतारी.

मी रंग रंग आवराता,
देहात गलथून जातो
तो थेंब थेंब सावरता
ओलावा कलथून देतो.

मी मोह मोह यात्रीचा
वाटेस उलथून देतो.
तो स्नेह स्नेह धात्रीचा
ह्रुदयात उमटून जातो.

ही गर्द धुक्याची वेळ
हां श्वास कोंड़ता वारा
तो घन दाटता भोवती
नयनात मोकळ्या धारा.

तो घन दाटता भोवती
नयनात मुक्तल्या धारा...

-भूराम
०८/२८/०९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा