रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

उषःकाल होता होता!

धरतीच्या आत उदासी
तो माणूस उगवित होता.
प्रहराशी प्राण निमुळता
देहास भोगवीत होता.

नियतीशी कोण विखुरला!
तो हरला आणिक सरला!
जगणारा श्वास उद्याशी
आक्रोश बडवीत होता.

रंगाशी निपजला तारा
नयनात गोंदाल्या धारा
घरट्यात चिमुकली चोच
पंखास खरडीत होता.

ती उठली आई माथी
शेणाची टोपली होती.
खपली खपली धरती
सारवून घे गं आता.

धरतीच्या आत उदासी
तो माणूस, उगवित होता.
उषःकाल होता होता!
सारवून घे गं आता.

-भूराम
१०/२४/२००९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा